हिवताप विभाग कर्मचाऱ्यांचे 
५ जुलैपासून आमरण उपोषण

हिवताप विभाग कर्मचाऱ्यांचे ५ जुलैपासून आमरण उपोषण

Published on

हिवताप विभाग कर्मचाऱ्यांचे
५ जुलैपासून आमरण उपोषण

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ ः राज्याच्या २९ सप्टेंबर २०२१च्या अन्यायकारक सेवाप्रवेश नियम अधिसूचनेस विरोध करून गेली दीड ते पावणेदोन वर्षे पदोन्नती तसेच १०, २०, ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर शासनाविरोधात ५ जुलैपासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की जुन्या सेवाप्रवेश अधिसूचनेनुसार दहावी उत्तीर्ण व आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडील १२ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या आणि आजपर्यंत सलग शासनसेवेमध्ये २० ते २५ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अधिसूचनेनुसार पदोन्नतीसाठी विज्ञान पदवी उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. ही शैक्षणिक अर्हता शासनसेवेत राहून संपादन करणे शक्य नसल्याने ही जाचक अट रद्द करणे तसेच १०० टक्के पदे पदोन्नतीने भरणे, अशा ग्राह्य मागण्यांसाठी संघर्ष समितीने गेले दीड वर्षे निवेदने, उपोषणे, मंत्री, सचिव यांच्याकडे पाठपुरावा करून मांडल्या आहेत. जिल्हा परिषदेकडील समान पद, समान वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या, इतर लाभ जुन्या नियमानुसार देण्यात येत आहेत. ही बाब अन्यायकारक असून याबाबत शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर संघर्ष समितीने उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, संबंधित विभागांचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक यांना निवेदने दिली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.