माध्यमांचा वापर जाणीवपूर्क करा

माध्यमांचा वापर जाणीवपूर्क करा

Published on

माध्यमांचा वापर जाणीवपूर्क करा
प्रा. प्रवीण बांदेकरः कुडाळात राऊळ महाराज महाविद्यालय वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. समाज भान ठेवून विचार केला पाहिजे. सामाजिक माध्यमांचा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करा, असे आवाहन प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.
क. म. शि. प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा नुकताच उत्साहात झाला. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक प्रा. बांदेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संत राऊळ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने वर्धापन दिन सोहळ्याचा प्रारंभ झाला. प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी क. म. शि. प्र. मंडळाचे पदाधिकारी सुरेश चव्हाण, केदार सामंत, महेंद्र गवस, सी. डी. सी. समितीचे सदस्य डॉ. रवींद्र जोशी, राजू केसरकर व निवृत्त माजी प्राचार्य डॉ. ए. एम. पठाण, माजी प्राचार्य डॉ. एस. बी. सावंत, शिवाजी घोगळे, निवृत्त कर्मचारी मोहन मांजरेकर, सगुण पेडणेकर, सुधाकर घोगळे, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष अॅड. नीलांगी रांगणेकर, महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे पहिले जी. एस. व कुडाळ पंचायत समिती माजी सभापती सुनील भोगटे, राजू कदम, प्रा. अरुण मर्गज, प्रा. समीर तारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळ या प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुस्तकासंबंधी प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शाल व श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे प्रा. बांदेकर, श्री व सौ. पठाण यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने माजी प्राचार्य, माजी कर्मचारी, माजी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एन. लोखंडे यांनी घेतला. महाविद्यालयाचे डॉ. वाय. जे. कोळी आणि त्यांच्या सात विद्यार्थ्यांचा त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत सत्कार करण्यात आला.     
अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील असून महाविद्यालयाने नॅक पुनर्मूल्यांकनासाठी सज्ज होण्याचे आवाहन उपकार्याध्यक्ष भाई तळेकर यांनी केले. प्राचार्य पठाण यांनी उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांची व शिक्षकांची भूमिका काय असावी, याबद्दल आपले विचार मांडले. प्राचार्य डॉ. एस. बी. सावंत, प्रा. अरुण मर्गज यांनी मनोगत व्यक्त केले. द्वारकानाथ घुर्ये यांनी शिक्षकांनी नेहमी सत्याचा पाठपुरावा करून अध्यापन करावे, असे आवाहन मनोगतातून केले. माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष अॅड. रांगणेकर यांनी महाविद्यालयीन आठवणी सांगून विद्यार्थ्यांनी अद्ययावत शिक्षण घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. आभार लेफ्ट. डॉ. एस. टी. आवटे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.