13 वर्षानंतरही ४५ किमी चौपदरीकरण अपूर्ण

13 वर्षानंतरही ४५ किमी चौपदरीकरण अपूर्ण

फाोटाो ८३६९३


पान १

लोगो
मुंबई-गोवा महामार्ग

१३ वर्षांनंतरही ४५ किमी चौपदरीकरण अपूर्ण
७ किमीच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव ः अडीच कोटी ठेकेदाराकडून करणार वसूल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : तेरा वर्षे झाली तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होण्याचे नाव घेईना. मंत्र्यांनी अनेक दौरे केले, ठेकेदारांना सक्त ताकीद केली तरी आजमितीला ३ टप्प्यातील ४५ किमीचे चौपदरीकरण अपूर्ण आहे. हा मार्ग पूर्ण व्हायला डिसेंबर २०२४ उजाडणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची पर्यायी व्यवस्था म्हणून आरवली ते कांटे टप्प्यातील ७ किमीचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अडीच कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर लक्ष ठेवून आहे. यंदाच्या पावसाळ्यात खोदाईमुळे अनेक अडचणी येऊ शकतात. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरपासून लांजापर्यंतचे काम झाले आहे; परंतु आरवली ते कांटे हा ३९ किमीचा टप्पा अपूर्ण आहे. आतापर्यंत १८ किमीच चौपदरीकरण झाले आहे. २१ किमीचे अजून बाकी आहे. कांटे ते वाकेड या दुसऱ्या टप्प्यात ४९ किमीचे काम आहे. त्यापैकी २९ किमी झाले असून, २० किमी शिल्लक आहे. चिपळूण तालुक्यातील ४ किमीचे चौपदरीकरण शिल्लक आहे, असे एकूण ४५ किमीचे चौपदरीकरणाचे काम जिल्ह्यात अपूर्ण आहे.
पावसाळा तोंडावर असून ठेकादारांच्या अंतर्गत आर्थिक वादामुळे या दोन टप्प्यातील काम रखडले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. ही गैरसोय कमी करण्यासाठी आरवली ते कांटे या टप्प्यातील जुन्या रस्त्याचे ७ किमीचे डांबरीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. अडीच कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.


कामामध्ये प्रचंड दिरंगाई
दोन्ही टप्प्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांकडून कामामध्ये प्रचंड दिरंगाई झाली आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन जुन्या रस्त्याचे ७ किमीचे डांबरीकरण केले जाणार आहे; परंतु त्यासाठी येणारा अडीच कोटींची रक्कम ठेकेदाराकडून वसूल केले जाणार आहेत.


पूर्वार्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com