उत्तरपत्रिका फेरतपासणीनंतर
विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण

उत्तरपत्रिका फेरतपासणीनंतर विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण

Published on

94689

उत्तरपत्रिका फेरतपासणीनंतर
विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण

कुडाळ, ता.३ ः वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च २०२४ उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता. यात ३ गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० गुण झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे शंभर टक्के गुण झाल्याने ती जिल्ह्यात, राज्यात प्रथम आली आहे.
पुनर्मूल्यांकनापूर्वी तिला ५०० पैकी ४९७ गुण होते. पुनर्मूल्यांकनानंतर तिला मराठी विषयात दोन व समाजशास्त्र या विषयामध्ये एक असे एकूण तीन गुण वाढले. परुळे सारख्या ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेच्या अर्पिताने मिळवलेले हे यश उल्लेखनीय आहे. अर्पिताच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, संस्था उपाध्यक्ष डॉ उमाकांत सामंत, संस्था सीईओ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने आदींनी तिचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.