जनआरोग्य योजना नवीन निर्णयानुसार सुरू

जनआरोग्य योजना नवीन निर्णयानुसार सुरू

Published on

जनआरोग्य योजना
नवीन निर्णयानुसार सुरू
रत्नागिरी, ता. ४ : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना नवीन अंमलबजावणीनुसार १ जुलै २०२४ पासून चालू केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
या योजनेचे लाभार्थी सर्व रेशनकार्डधारक व आयुष्यमान भारत कार्डधारक असणार आहेत. महाराष्ट्रातील कोणतेही रेशनकार्ड, आयुष्यमान भारतकार्ड, ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड ), रेशनकार्ड नसल्यास तहसीलदारांचे प्रमाणपत्र, रस्ता अपघातग्रस्तांसाठी ज्या जिल्ह्यामध्ये लाभ घेणार आहे त्या जिल्ह्यातील एमएलसी ओळखपत्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील रेशनकार्ड, ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड अशी कागदपत्रे लागणार आहेत. या योजनेंतर्गत एकूण १३५६ आजारांवर मोफत उपचार, त्यापैकी ११९ शासकीय रुग्णालयास राखीव, रस्ता अपघातग्रस्त रुग्णास प्रतिवर्षी १ लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. नवीन अंमलबजावणीबाबत ३० जूनला सर्व रुग्णालयास राज्य व जिल्हास्तरावरून सूचना देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.