रत्नागिरी 20 जुलैपर्यंत विशेष मोहिम

रत्नागिरी 20 जुलैपर्यंत विशेष मोहिम

Published on

शाळाबाह्य बालकांसाठी
२० जुलैपर्यंत विशेष मोहिम
रत्नागिरी, ता. ७ ः शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन घेण्यासाठी जिल्हा परीषद शिक्षण विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी २० जुलै पर्यंतचा कालावधीत देण्यात आला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियम २००९ राज्यात १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आले. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे स्थलांतर होते. त्यांच्यासोबत असणार्‍या मुलांचे शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. अशा शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक ५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करावयाचे आहे. ३ ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण या कालावधीमध्ये केले जाणार असून ३ ते ६ वयोगटाची जबाबदारी महिला व बाल विकास अधिकारी, तर ६ ते १४ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि १४ ते १८ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यशस्वी होण्याकरिता तालुकास्तरावर, वॉर्डस्तर समिती, केंद्र व गावस्तर समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी गावागावात पाहणी करावी अशा सूचना गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.