शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्ज योजनाचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्ज योजनाचा लाभ घ्यावा

Published on

‘कर्ज योजनाचा लाभ
शेतकऱ्यांनी घ्यावा’

रत्नागिरी ः शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात पिककर्ज, कृषीवाहन, शेती यांत्रिकीकरण, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनसारख्या इतर कृषी संलग्न व्यवसायांसाठी कर्ज मिळू शकते. शेतकऱ्यांना बँकेच्या कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी झोनचे विभागप्रमुख नरेंद्र देवरे यांनी केले.
बॅंक ऑफ इंडिया रत्नागिरी विभागातर्फे १ ते ३१ जुलै या कालावधीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ''किसान माह''चे आयोजन केले जाते. दरवर्षी बॅंकेच्या राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त १९ जुलै हा दिवस किसान दिवस​ म्हणून साजरा केला जातो. किसान माहच्या उत्सवानिमित्त रत्नागिरी झोनमधील बँक शेतकऱ्यांना विशेष लाभ देते. शेतकऱ्यांसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समुहांनी कर्ज प्रस्ताव सादर करून आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे बॅंकेने कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.