कणकवली येथील विश्रामगृहाला गळती

कणकवली येथील विश्रामगृहाला गळती

Published on

95811

कणकवली येथील
विश्रामगृहाला गळती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील नुतन विश्राम गृहाला गळती लागल्याचा पोलखोल आमदार वैभव नाईक यांनी केला. दरम्यान मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिंधुरत्न विश्रामगृहाची माहिती घेतली असता या विश्रामगृहाला देखील गळती लागल्याचे निदर्शनास आले.
सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र पहिल्या पावसात हे काम निकृष्ट झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामध्ये विश्रामगृहाच्या छप्पराचा काही भाग तुटून पावसाच्या पाण्याची धार लागली आहे. भितींमध्ये पाणी पाझरून त्या ओल्या झाल्या आहेत. स्लॅब मधून पाण्याचे थेंब पडत आहेत. त्याठिकाणी बकेट ठेवण्यात आले आहे. फर्नीचरला बुरशी पकडली आहे. यावरून विश्रामगृहाच्या कामात शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांवर सावर्जनिक बांधकाम मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल आमदार नाईक यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.