‘शक्तीपीठ’मुळे सावंतवाडीचे महत्त्व कमी होईल

‘शक्तीपीठ’मुळे सावंतवाडीचे महत्त्व कमी होईल

Published on

61857

‘शक्तिपीठ’मुळे सावंतवाडीचे महत्त्व कमी होईल

आमदार महेश सावंत ः स्वार्थासाठी केसरकरांकडून पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः मुंबई-गोवा महामार्ग शहराबाहेरून गेल्याने सावंतवाडीचे महत्त्व कमी झाले. आता शक्तिपीठ महामार्गही बाहेरून जाणार असल्यानेशहराचे महत्त्व आणखी कमी होईल, असे ठाकरे शिवसेनेचे माहीम (मुंबई)चे आमदार महेश सावंत यांनी म्हटले आहे. आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला स्वार्थ ठेवून पाठिंबा दर्शविला आहे. केसरकरांच्या जवळच्या त्या परिसरातील गुंतवणूकदारांच्या जमिनींना सोन्याचा भाव मिळेल, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आमदार सावंत म्हणाले, ‘‘मुंबई-गोवा महामार्ग बाहेरून गेल्याने सावंतवाडी शहराचे महत्त्व कमी झाले. आता शक्तिपीठ महामार्गही बाहेरून गेल्याने सावंतवाडीत पर्यटक येणार नाहीत, तेही महत्त्व कमी होईल. केसरकारांचे शक्तिपीठ महामार्गाला समर्थन म्हणजे स्वार्थ आहे. त्यांच्या जवळच्या गुंतवणूकदारांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या. एकरी दहा ते बारा हजार रुपये मोजले आणि आता रस्ता झाला तर गुंठ्यांमागे दहा ते वीस लाख रुपये भाव मिळेल. जमिनींना सोन्याचा भाव मिळणार म्हणूनच केसरकर शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत. गुंतवणूकदारांनी चार ते पाच हजार हेक्टर जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, अशी माझ्याकडे माहिती आहे. आपल्या जवळच्या उद्योजकांच्या जमिनींना चांगला भाव मिळावा म्हणूनच केसरकर शक्तिपीठ मार्गाचे समर्थन करत आहेत. मात्र, त्यामुळे सावंतवाडी शहराचे मोठे नुकसान होणार आहे.’’ शक्तिपीठ महामार्गाला तेथील लोकांचा विरोध असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि सरकार दरबारी आवाज उठवू. स्थानिकांना अभिप्रेत भूमिका घेतली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा, संजय गवस व पदाधिकारी उपस्थित होते.
-----------
फायद्याच्या प्रभागांसाठी जातनिहाय सर्वेक्षण
जातनिहाय सर्वेक्षणाबाबत विचारले असता आमदार सावंत म्हणाले, ‘‘प्रत्येक पक्षात जातनिहाय डाटा असतो. सरकारचा काय हेतू आहे, ते माहीत नाही. मताधिक्य पाहून प्रभाग फोडायचे असतील. फायद्याचे प्रभाग बनवायचे असतील. मताधिक्याच्या आघाडीवर ते प्रभाग बनवणार असतील. भाजपची सत्ता आल्यानंतर जातपात उफाळून आला आहे. जात-पात आणि हिंदू-मुस्लिम हे भाजपच उरकून काढत आहे. शिवसेना आणि काँग्रेसने कधीही जात-पात पाहिली नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com