महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतीला धोका

महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतीला धोका

Published on

- rat२०p१३.jpg -
२५N७१९०२
साखरपा : निवृत्त ग्रामसेवक चिले यांच्या शेतात सोडलेले रस्त्याच्या गटाराचे पाणी.

‘ती’ शेती नापीक होण्याची भीती
मिऱ्या-नागपूर महामार्ग ; ठेकेदाराचा हलगर्जीपणा
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २० : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका कोंडगाव येथील शेतकऱ्याला बसला आहे. त्या ठेकेदाराने महामार्गावर मोरी बांधून त्याचे पाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोडून दिले आहे. त्यामुळे शेती नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. काही ठिकाणी मोऱ्या बांधण्यात येत असून, महामार्गावर खोदाई केली जात आहे. त्यात नियोजन नसल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. साखरपा येथील कोंडगावचे चंद्रकांत कृष्णाजी चिले यांच्या शेतीला मोठा फटका बसलेला आहे. चिले हे निवृत्त ग्रामसेवक आहेत. त्यांची शेतजमीन महामार्गाला लागून आहे. महामार्ग बांधताना संबंधित ठेकेदाराने तिथे मोरी बांधली. या मोरीतून वाहणारे सर्व पाणी आता चिले यांच्या शेतात जात आहे. परिणामी, लावलेले भातशेत धोक्यात आले आहे.
या सगळ्या प्रकाराविरुद्ध चिले यांनी लेखी तक्रार संगमेश्वर तहसील कार्यालयात तसेच कोल्हापूर येथील प्रकल्प कार्यालयात दिली आहे. या तक्रारीची दखल घेऊन चिले यांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर महामार्गावरील कामे नियोजनबद्ध करावीत, अशा सूचनाही ग्रामस्थांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com