आंबोली धबधब्यावर
पोलिसांकडून ‘मनाई’

आंबोली धबधब्यावर पोलिसांकडून ‘मनाई’

Published on

आंबोली धबधब्यावर
पोलिसांकडून ‘मनाई’
आंबोली, ता. २९ : वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलिसांनी येथील प्रसिद्ध धबधब्यावर प्रवेश बंद केला. त्यामुळे हजारो पर्यटकांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली. धबधब्याच्या ठिकाणी एक झाड वाकले असून ते पडण्याची शक्यता असल्याचे सांगून पोलिसांनी शनिवारी (ता. २८) दुपारी ४ वाजता पर्यटकांसाठी धबधब्यावर प्रवेश बंद केला. त्यामुळे शेकडो किलोमीटरवरून वाहने घेऊन ‘वीकेंड’ची मजा घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांकडे कर्मचारी बळ कमी असल्याने पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकताही पर्यटक व्यक्त करीत आहेत. पोलिस प्रशासनाची मनमानी सुरू राहिल्यास आंबोलीतील पर्यटनावर त्याचा परिणाम होणार असून, येथील पर्यटन व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com