तिलारी धरणामधून 
उद्या पाण्याचा विसर्ग

तिलारी धरणामधून उद्या पाण्याचा विसर्ग

Published on

तिलारी धरणामधून
उद्या पाण्याचा विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३० : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिपर्जन्यवृष्टी होत असल्याने तिलारी धरणाच्या जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या ७० टक्के क्षमतेने पाणी धरणात भरले आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २) तिलारी नदीला अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे.
नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगून कोणीही पाण्यात उतरू नये, असे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात २५ जूनपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ७० टक्के भरले आहे. दिवसाला तीन टक्के पाणी धरणाच्या जलाशयात भरत आहे. धरण ७८ टक्के भरल्यावर हे पाणी नियंत्रित करण्यासाठी पुच्छ कलव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तिलारी नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी व शेतीची कामे करताना पाण्यात कोणीही उतरू नये. महिलांनी नदीत कपडे धुण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com