आंबा बागयतदारांना मिळणार १५ लाख

आंबा बागयतदारांना मिळणार १५ लाख

Published on

आंबा बागायतदारांना मिळणार १५ लाख
अवकाळीत नुकसान ; ४०.०१ हेक्टरला फटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानापोटी शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मान्यता दिली आहे. जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे १८३ आंबा बागायतदारांच्या एकूण ४०.०१ हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानापोटी शासनाकडून १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील ४७३.६९ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन १३.६०७ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची ही रक्कम जमा केली जाणार आहे.

चौकट....
राजापुरात १३.३५ हेक्टर क्षेत्र बाधित
कृषी विभागातर्फे एप्रिल व मे मधील नुकसानग्रस्त भागाचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. एप्रिलमध्ये राजापूर तालुक्यातील ३० आंबा बागायतदारांचे १३.३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या नुकसानापोटी ३ लाख ४ हजार इतक्या भरपाईची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात जिल्ह्यातील १५३ आंबा बागायतदारांचे २६.६६ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com