दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

Published on

पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
१०वीचा २७.६५ तर १२वीचा ३२.०५ टक्के ; एक गैरमार्ग उघड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाचा दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. दहावीचा निकाल २७.६५ टक्के व बारावीचा निकाल ३२.०५ टक्के लागला. रत्नागिरीमध्ये बारावीच्या परीक्षेमध्ये एक गैरमार्ग प्रकरण उघडकीस आले.
लेखी परीक्षा २४ जून ते १४ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दहावीसाठी ४, सिंधुदुर्गमध्ये २ व बारावीसाठी ३ व २ परीक्षाकेंद्रे होती. दहावीसाठी १९१ जणांनी नोंदणी केली व १८८ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यातील ५२ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण २७.६५ टक्के आहे. बारावीसाठी ३९८ जणांनी नोंदणी केली व ३९० जण परीक्षेस बसले. यातील १२५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ३२.०५ टक्के आहे.
गुण पडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रती व पुनर्मुल्यांकनाचा कालावधी ३० जुलै ते ८ ऑगस्ट आहे. याकरिता ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय ठेवली आहे तसेच ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे. श्रेणी, गुणसुधार योजनेअंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यासाठी तीन संधी आहेत. यामध्ये मार्च २०२६, जून-जुलै व फेब्रुवारी-मार्च २०२७ उपलब्ध आहेत, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com