क्रांतिवीरांचे समर्पण, त्याग अंगीकारा
83527
क्रांतिवीरांचे समर्पण, त्याग अंगीकारा
बाबूराव कविटकर : सावंतवाडी ‘आरपीडी’ हायस्कूलमध्ये ‘क्रांती दिन’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : क्रांती दिन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ८ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधींनी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ‘भारत छोडो’ची घोषणा केली, तर ९ ला ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली. या दिवसाला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणून ओळखले जाते. क्रांतिवीरांच्या त्यागाप्रमाणे आताच्या तरुण पिढीने भारतीय सैन्यदलात भरती होऊन भारत मातेच्या रक्षणासाठी समर्पणात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कॅप्टन बाबूराव कविटकर यांनी केले.
क्रांती दिनाचे औचित्य साधून येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. श्री. कविटकर म्हणाले, ‘‘या आंदोलनाचा मुख्य उद्देश ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यासाठी दबाव तयार करणे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, हा होता. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला हादरा बसला आणि भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची नवी ऊर्जा निर्माण झाली. हीच ऊर्जा घेऊन आताच्या तरुण पिढीने भारतीय सैन्यदलात भरती होऊन भारत मातेच्या रक्षणासाठी समर्पणात्मक भूमिका घेतली पाहिजे.’’
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय स्वतंत्र संग्रामात बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांना क्रांती मशाल प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक सांस्कृतिक कमिटीप्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर यांनी केले. उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी, नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव राहावी, यासाठी क्रांती दिन साजरा केला जातो, असे सांगून थोर क्रांतिवीरांना अभिवादन केले. उपमुख्याध्यापक संजय पाटील यांनी क्रांती दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कॅप्टन सुभाष सावंत यांनी स्वानुभवातून सैन्यदलात भरती होण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण महत्त्वाचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. बारावीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत आणि वैयक्तिक गीतगायन केले. सांस्कृतिक कमिटीप्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटीप्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा. जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा. सविता माळगे, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा. रणजित राऊळ, प्रा. पवन वनवे, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. माया नाईक, प्रा. सृहा टोपले, प्रा. नीलेश कळंगुटकर, प्रा. राहुल कदम आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. ठाकूर यांनी केले. आभार प्रा. डिसिल्वा यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.