नव उद्योजकांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
नव उद्योजकांनी टोल फ्रीवर संपर्क साधा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग सुरू करण्याच्यादृष्टीने माहिती देण्यासाठी मैत्री कक्षाची निर्मिती केली आहे. त्यासाठी १८००-२३३-२०३३ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिकाधिक उद्योजकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
उद्योग कसा सुरू करावा, उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, शासनाच्या विविध योजना व सवलती, राज्यातून विदेशात माल निर्यात कसा करावा. यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती आदींबाबत मैत्री कक्षाकडून मोफत माहिती पुरवली जाणार आहे. त्यासाठी मैत्री कक्षाचा १८००-२३३- २०३३ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मैत्री कक्ष ही महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी मदत करणारी संस्था आहे. जी महाराष्ट्रातील उद्योगांच्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम करते. जास्तीत जास्त नागरिकांनी, उद्योजकांनी, नवउद्योजकांनी या सुविधेबद्दल माहिती मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आजगेकर यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.