लोकवस्तीत शिरणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
‘त्या’ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
खेडशी ग्रामपंचायत ; जिल्हा प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मानवीवस्तीमधील शिरकाव वाढत आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील खेडशी गावामध्ये गव्यांच्या कळपाने उच्छाद मांडला आहे. त्यात बिबट्याचा संचार वाढल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण असून, नुकसानीमुळे हैराण आहेत. या वन्यप्राण्यांच्या तत्काळ बंदोबस्त करा, असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले. खेडशी ग्रामपंचायतीने निवेदन दिले आहे.
गावाचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे आणि येथे एकूण १४ वाड्या आहेत. गावातील बहुतांश लोक शेती आणि बागायतीवर अवलंबून आहेत. काजू, आंबा आणि पालेभाज्यांच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचे वर्षभराचे जीवन अवलंबून असते; मात्र, सध्या खेडशी आणि डफळचोळवाडी परिसरात रानगवे फिरत आहेत. बिबट्याची दहशतही गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात आहे. गवे शेतीचे नुकसान करत आहेत. माकडांचाही मोठा उपद्रव होत आहे. ग्रामस्थांच्या या अडचणी लक्षात घेऊन खेडशी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे धाव घेतली आहे. वनविभागाकडे यापूर्वी बंदोबस्त करण्याची मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने संबंधित यंत्रणेला पुन्हा एकदा निवेदन दिले आहे. या वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा जेणेकरून शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळेल. या निवेदनाची प्रत तहसील कार्यालयालाही पाठवण्यात आल्याची माहिती सरपंच वसंत उर्फ आबा बंडबे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.