
92225
‘समृद्ध पंचायत’ नियोजनबद्ध राबविणार
वैभववाडी गटविकास अधिकारी; संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १७ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान तालुक्यात नियोजनबद्ध राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतनिहाय संपर्क अधिकारी नेमले असून सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात पूर्ण ताकदीनिशी उतरावे, असे आवाहन येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी आज येथे केले.
श्री.जंगले यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अधीक्षक मनोज सावंत, संतोष टक्के आदी उपस्थित होते.
श्री. जंगले म्हणाले, ‘‘राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले जात आहे. या अभियानातर्गंत १७ ध्येय आणि १६९ उद्दिष्टे निश्चित केली आहेत. यामध्ये ७ मुख्य घटक आहेत. सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिवीका विकास व सामाजिक न्याय आणि लोकसहभाग व श्रमदान माध्यमातुन लोकचळ या घटकांचा समावेश आहे. तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान पूर्ण ताकदीनिशी राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला एक असे ३४ निरीक्षक अर्थात संपर्क अधिकारी नेमले आहेत. या अभियानाला स्पर्धेचे स्वरूप असल्यामुळे ग्रामपंचायतीना चांगली संधी निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पूर्ण ताकदीने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.जंगले यांनी केले.
------------
लाखांची बक्षिसे
तालुकापातळीवर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीला १५ लाख, द्वितीय क्रमांकाला १२ लाख, तृतीय क्रमांकास ८ लाख आणि उत्तेजनार्थ दोन ग्रामपंचायतींना पाच, पाच लाख बक्षिस देण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानात अनेक ग्रामपंचायती सक्रीय सहभाग घेणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.