जिल्ह्यात 30 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
जिल्ह्यात आणखी
तीन दिवस मुसळ‘धार’
तरुणाईचा हिरमोड ः भात शेतीवर संकट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील चार दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऐन नवरात्रीत पडणाऱ्या पावसामुळे दांडिया खेळणाऱ्या तरुणाईचा हिरमोड झाला आहे. तसेच हळव्या भातशेतीची कापणीही रखडणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी ४.२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड १.२५, खेड ६.५२, दापोली ७.४२, चिपळूण ३.४४, गुहागर ३.२०, संगमेश्वर २.३३, रत्नागिरी ३.३३, लांजा ९, राजापूर २.१२ मिमि पाऊस झाला आहे. काल रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. आज सकाळी पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली होती. मात्र, दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले आणि पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. ऐन नवरात्रीत पाऊस सुरू झाल्यामुळे दांडिया खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर ३० तारखेपर्यंत राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात काही भागांत मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वारे वाहतील, असा अंदाज आहे. या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.