साखरीनाटे बंदर गाळात रुतले

साखरीनाटे बंदर गाळात रुतले

Published on

-rat१p२५.jpg-
२५N९६०००
राजापूर ः राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदर.
-----
साखरीनाटे बंदरात गाळाचे संकट वाढले
मासेमारीत मोठी अडचण ; गाळ उपशाबाबत ठोस निर्णयाची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्‍या क्रमांकाचे बंदर म्हणून ओळखल्या जात असलेल्या तालुक्यातील साखरीनाटे बंदर वर्षानुवर्षे साचलेल्या गाळामध्ये रूतले आहे. विशेषतः जैतापूर सुरूबन आणि घेरा-यशवंतगड परिसरातील निमुळत्या खाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळाचा संचय झाला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी होड्या घेऊन बंदरामध्ये या भागातून शिरताना आणि जीव धोक्यात घालून मासेमारी केल्यानंतर बंदरात शिरणे हेच या मच्छीमार बांधवांसाठी आव्हानात्मक बनले आहे. या बंदर पसिरामध्ये सुमारे २५० ते ३०० नोंदणीकृत छोट्या-मोठ्या मच्छीमारी नौका असून दररोज या बोटींमार्फत समुद्रात जाऊन मासेमारी केली जाते. देशभरातच नव्हे परदेशातही या भागातील मासळी निर्यात होऊन तिची विक्री होते. मासेमारीतून या बंदरामध्ये दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते.
मासेमारी करण्यासह अन्य विविध स्वरूपाची कामे अनेक मच्छीमार बांधव या ठिकाणी करीत असून त्याच्यातून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या मासेमारीवर अवंलबून आहे. मात्र, नदीपात्रातून वर्षानुवर्षे वाहत येणारा गाळ बंदर परिसरामध्ये साचला आहे. या गाळाचा सातत्याने उपसा व्हावा अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून केली जात आहे. मात्र, शासनाकडून गाळ उपशाबाबत अद्यापही कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने बंदरात साचलेल्या गाळाच्या उपशाचा निर्णय प्रलंबित आहे. जैतापूर सुरूबन आणि घेरा-यशवंतगड परिसरातील निमुळत्या खाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळाचा संचय झाला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी होड्या घेऊन बंदरामध्ये या भागातून शिरताना आणि मासेमारी केल्यानंतर बंदरात येताना या साचलेल्या गाळाच्या समस्येचा मच्छीमार बांधवांना सामना करावा लागतो. अनेकवेळा बोटी अडकून पडून मच्छीमारांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते.
---
चौकट
बोटी अडकण्याच्या घटना
मासेमारी करून परतल्यानंतर, बंदरामध्ये शिरताना जैतापूर सुरूबन आणि घेरा-यशवंतगड परिसरातील निमुळत्या खाडी भागामध्ये मोठ्याप्रमाणात साचलेल्या गाळामध्ये बोटी अडकण्याच्या घटना वारंवार घडतात. विशेषतः ओहोटीच्या काळात ही समस्या अधिक तीव्र स्वरूप धारण करते. अनेकदा बोटी खाडीतच अडकून बसतात. त्यामुळे मच्छीमारांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागते. या दरम्यान बोटीचे यांत्रिक नुकसान होण्यासोबत मोठ्या प्रमाणावर मासळीही खराब होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

कोट
साखरीनाटे बंदरात साचलेल्या गाळामध्ये वारंवार बोटी अडकण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने गाळ उपसा करण्याच्या उपाययोजना हाती घ्याव्यात. अन्यथा, मच्छीमारांची उपजीविका धोक्यात येईल.
--वजूद बेबजी, माजी चेअरमन, साखरी-नाटे मच्छीमार सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com