
rat15p30.jpg-
98773
राजापूर ः पावसामध्ये भिजलेले भात.
rat15p31.jpg-
98774
राजापूर ः अचानक आलेल्या पावसापासून संरक्षणासाठी लोकांनी घेतलेला प्लास्टिक कागदाचा आधार.
राजापुरात पावसाने भातशेतीची वाताहात
सोलगावसह पश्चिम भागात फटका; कापलेली रोपं भिजली, झोडलेल्या भातात पाणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ः नवरात्रोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तालुक्यात भातकापणीच्या कामांना वेग आला होता; मात्र बुधवारी (ता. १५) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. विशेषतः सोलगावसह पश्चिम भागात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वेगवान वाऱ्यासह दुपारी पडलेल्या पावसाने मात्र, शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी पेरले गेले आहे. दुपारी कडक ऊन असतानाच अचानकपणे सुरू असलेल्या पावसाने कापलेले भात शेतातच भिजले तर भातझोडणी करताना पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
भातलावणीवेळी पावसाच्या लपंडावानंतर शेतकऱ्यांनी यावर्षी वेळेत लावणीची कामे उरकली होती. त्यानंतर पाऊस नियमित राहिल्याने यंदा भातशेतीही तरारली होती. त्यातून चांगले उत्पादन मिळणार असल्याने बळीराजा सुखावला होता. नवरात्रोत्सवानंतर परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भातकापणीला वेग आला होता. शेतशिवारंही गजबजू लागली; मात्र त्यांच्या मेहनतीवर पावसाने पाणी फेरले आहे. सकाळपासून स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कडक ऊन पडलेले होते. दुपारी अचानक वेगवान वारे वाहू लागले. त्यामध्ये विशेषतः पश्चिम भागातील गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सकाळी भातकापणी करून रोपं वाळवण्यासाठी शेतामध्ये पसरवून ठेवलेली होती. काही शेतकऱ्यांनी दुपारी शेतांमध्ये भातझोडणीच्या कामाला सुरवात केली होती; परंतु अचानक आलेल्या पावसाने सर्व भिजून गेले. वाळवण्यासाठी शेतामध्ये ठेवलेले भात भिजले असून, ते वाळवण्यासाठी शेतकऱ्यांना दुबार मेहनत घ्यावी लागणार आहे तर, भातझोडणी सुरू असताना अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एक तारांबळ उडाली होती.
चौकट
...तर भातरोपांना येतील फुटवे !
कापणीवेळी करपारोगासह किडीच्या झालेल्या प्रादुर्भावाने होणाऱ्या संभाव्य नुकसानीने शेतकरी पुरता हतबल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाच्या अधुनमधून सरी पडत होत्या. सतत पाऊस सुरू राहिला तर कापलेल्या भाताच्या परिपक्व दाण्यांना नव्याने फुटवे येण्याची भीती आहे. आधीच वन्यप्राण्यांनी शेतशिवारात धुडगूस घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यात पावसाची भर पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.