महामार्गावर धुळीचे साम्राज्य, प्रवासी त्रस्त
महामार्गावर धुळीचे साम्राज्य, प्रवासी त्रस्त
दक्षिण जिल्हाप्रमुख प्रसाद सावंतः ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पावसाळा थांबल्यानंतर या मार्गावरील काही ठिकाणी नागरिकांना धूळ, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने गांभिर्याने लक्ष द्यावे, अन्यथा युवासेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
मिऱ्या ते कोल्हापूर या मार्गाचे कामाला सुरवातीला वेग होता. मात्र ठेकेदाराला वेळेत अर्थपुरवठा न झाल्यामुळे कामाचा वेग मंदावला. गेल्या काही महिन्यात पुन्हा वेगाने काम सुरू झालेला आहे. गेल्या काही दिवसात पाली ते साखरपा या टप्प्यात बऱ्यापैकी काम पूर्ण झाले आहे. परंतु जिथे काम अपुर्ण आहे, त्या परिसरात ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दुचाकीवरून प्रवास करणारे धुळीमध्ये माखुन जातात. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाऊस थांबल्यानंतर पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे रस्त्यावरील धूळ सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुढचा रस्ता दिसणेही कठीण झाले आहे. या गोंधळात अपघातांची शक्यता वाढली असून, ही परिस्थिती जनतेच्या जीवाशी खेळ केल्यासारखी आहे.
याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत युवासेना दक्षिण जिल्हाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रसाद सावंत यांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना धुळीवर वेळीच उपाय करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही युवासेनाच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे आणि महामार्गाचे काम नियोजित मुदतीत पूर्ण करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
कोट
महामार्गाच्या कामात झालेला विलंब असह्य झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे आणि आरोग्याकडे शासन व कंत्राटदार दोघांचेही दुर्लक्ष झाले आहे. जर त्वरीत उपाययोजना करून कामाची गती वाढवली नाही आणि धुळीपासून बचावासाठी योग्य उपाय केले नाहीत, तर युवासेना आपल्या शैलीत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. रस्त्याचे काम करताना नागरिकांच्या सोयी-सुविधांचा विचार करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या निष्काळजीपणाबद्दल प्रशासनाला जाब विचारला जाईल आणि गरज पडल्यास ठिकठिकाणी आंदोलन उभारू
- प्रसाद सावंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

