‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनास माहिती द्यावी’
‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी
प्रशासनास माहिती द्यावी’
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः जिल्ह्यात सद्यस्थितीत भात व नाचणी पिकाची कापणी चालू असून, २१ ऑक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. गावातील सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १३६ गावांमध्ये १ हजार १८ शेतकऱ्यांचे १९६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास कळविला असून तो शासनास सादर करण्यात आला आहे.
या अहवालानुसार प्राथमिक नुकसानीमध्ये प्रामुख्याने भात व नाचणी या पिकांचा समावेश असल्याचे आढळून येत आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी संबंधित गावातील सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. नुकसानीबाबत माहिती प्राप्त झाल्यास संबंधित क्षेत्रीय अधिकारी शेतीची पाहणी करतील. अधिक माहितीसाठी ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती वेळेत द्यावी, असे आवाहनही केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

