स्वच्छतेचे महत्व विद्यार्थी प्रत्येकापर्यंत पोचवतील
-rat२८p१८.jpg-
२५O०१०२०
पावस ः गणेशगुळे किनाऱ्यावरील स्वच्छतेत सहभागी झालेले अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी.
----
स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थी प्रत्येकापर्यंत पोचवतील
प्रसाद तोडणकर ः कुर्धेतील निवासी शिबिरात गणेशगुळे किनाऱ्याची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २८ ः शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या सवयी व संस्कार मिळाल्यानंतर त्याची प्रगती होते. किनाऱ्यावरील स्वच्छतेचे महत्त्व पटल्यामुळेच हे विद्यार्थी भविष्यात स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचवतील व त्यातूनच एक स्वच्छतेची चळवळ निर्माण होईल, असे गणेशगुळेचे सरपंच प्रसाद तोडणकर यांनी सांगितले.
रत्नागिरी येथील अभ्यंकर-कुलकर्णी विद्यालयाच्या कुर्धे येथील निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गणेशगुळे येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. या शिबिरामध्ये परिसरातील भागामध्ये श्रमदान करून रस्त्यांची साफसफाई केली. एनएसएस निवासी शिबिरांतर्गत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी सरपंच तोडणकर यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिर निवासस्थानापासून गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यापर्यंत त्यांनी वाहतूक खर्च केला. या निमित्ताने सूत्रसंचालन कार्यशाळा झाली. त्यामध्ये प्रा. सुप्रिया टोळे यांनी स्वयंसेवकांना प्रभावी सूत्रसंचालन होण्यासाठी काय करावे, काय करू नये, हे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

