लांजा ःअधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा
rat31p18.jpg- 
01547
लांजा ः पावसामुळे बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार किरण सामंत.
------------ 
अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा 
आमदार किरण सामंतः पालकमंत्र्यांबरोबर संवाद
लांजा, ता. ३१ः वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी व महसूल, गटविकास अधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पंचनामे करून अहवाल सादर करावा. शासनाकडून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात, नाचणीसह फळबागांनाही फटका बसलेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी लांजा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना भेटी दिल्या तसेच संबंधित विभागांना आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. पालकमंत्री सामंत यांच्यासमवेत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चाही केली. लवकरच शासनदरबारी नुकसान भरपाईसाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसामुळे आणि अलीकडील वादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती, नुकसानीचे प्राथमिक अंदाज आणि प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची माहिती आमदार सामंत यांनी पालकमंत्र्यांना दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला नुकसानग्रस्त भागांचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, शेतकऱ्यांना शक्य तितकी आर्थिक मदत देण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

