''अवकाळी''ग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी

''अवकाळी''ग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी

Published on

swt42.jpg
02351
कणकवलीः तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देताना सरपंच गुरुनाथ आचरेकर.

‘अवकाळी’ग्रस्तांना तत्काळ
नुकसान भरपाई मिळावी
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ४ः भात आणि नाचणी या हंगामी पिकांवर अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यांचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी कोळोशी ग्रामपंचायतीचे सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी तालुका कृषी अधिकारी, कणकवली यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागील काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे कोळोशी गावातील शेती मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती आचरेकर यांनी अधिकाऱ्यांकडे केली. याशिवाय, जंगली माकडांमुळे बागायती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची माहितीही सरपंचांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माकडांच्या वाढत्या उच्छादापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com