जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने करा

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने करा

Published on

-rat७p२८.jpg-
२५O०३०७५
रत्नागिरी ः मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलताना मंत्री नीतेश राणे.
----
जयगड बंदरातून काजू निर्यातीची
प्रक्रिया गतीने करा ः नीतेश राणे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी दिल्या. रत्नागिरी जयगड बंदरातून काजू निर्यात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपकुमार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात झाल्यास त्याचा काजू उत्पादकांना फायदा होईल. या बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने मिळाव्यात यासाठीही संबंधित विभागाने कार्यवाही करावी. या आढावा बैठकीत पणन मंडळ, स्मार्ट व मॅग्नेट, एफएसएसआय, रेल्वे या विभागाकडील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com