भातपीक सुकवण्यासाठी महामार्गाचा उपयोग

भातपीक सुकवण्यासाठी महामार्गाचा उपयोग

Published on

03571

भातपीक सुकवण्यासाठी महामार्गाचा उपयोग
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता १० : बांधून पूर्ण झालेले; पण वाहतुकीसाठी खुले न झालेले महामार्गावरील टप्पे सध्या शेतकर्‍यांचे मित्र बनत चालल्याचे समोर येत आहे. अशा ठिकाणी कापणी केलेले भातपिक शेतकऱ्‍यांनी सुकवण्यासाठी पसरलेले चित्र जागोजागी पाहावयास मिळत आहे.
रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग आंबाघाटाच्या पायथ्यापर्यंत काही अपवाद वगळता एका बाजूने बांधून पूर्ण झाला आहे. काही ठिकाणच्या मोऱ्‍या, नदीवरील पऱ्‍यांवरील छोटे पूल बांधण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या आसपासचे महामार्गाचे काही भाग बांधून पूर्ण झाले असले तरी वाहतुकीस खुले केलेले नाहीत. महामार्गावरील हीच ठिकाणे सध्या शेतकऱ्‍यांच्या सोयीची ठरत आहेत. महामार्गाच्या आसपास शेती करणारे शेतकरी कापून झालेले भातपिक महामार्गावर आणून सुकवत आहेत. वाहतूक नसल्यामुळे शेतकऱ्‍यांची मोठी सोय होताना दिसत आहे. सिमेंटचे रस्ते दुपारच्या उन्हात तापत असल्यामुळे पसरलेले भातपिक चांगले सुकते. त्यामुळे पाली ते साखरपादरम्यान ठिकठिकाणी कापलेले भातपिक शेतकऱ्‍यांनी रस्त्यावर पसरल्याचे पाहावयास मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com