राजापूर-राजापुरात हजारभर बंधारे अडवणार पाणी
rat11p10.jpg-
3706
राजापूर ः नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने कोरडे पडत चाललेले नदीपात्र.
-rat11p11.jpg-
राजापूर ः लोकसहभागातून बांधण्यात आलेले वनराई बंधारा.
--------------
राजापुरात हजारभर बंधारे अडवणार पाणी
टंचाईकाळात उपयोग; प्रत्येक ग्रामपंचायतीला दहाचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी पडलेला पाऊस आणि नोव्हेंबर महिन्यातच पाण्याअभावी नदीची कोरडी पडलेली पात्रं यामुळे तालुक्याला लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आतापासूनच नियोजन सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दहा यानुसार तालुक्यामध्ये एक हजाराहून अधिक वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
वनराई बंधारे बांधण्याच्या या अभियानामध्ये लोकप्रतिनिधींसह ग्रामपंचायत, ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रशासन आदी सहभागी होणार आहेत. एप्रिल-मे महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्धारित करण्यात आलेले वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट गाठल्यास पाणीटंचाईची झळ कमी प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसहभागातून गावोगावी बांधण्यात येणार्या बंधारे अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

