रत्नागिरीत परिवर्तन पदयात्रेची सांगता
परिवर्तन पदयात्रेची सांगता
रत्नागिरी, ता. ११ ः रत्नागिरी शहराच्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या परिवर्तन पदयात्रेची सोमवारी (ता. १०) सांगता झाली. पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी कार्यकर्त्यांसह रत्नागिरीतील प्रसिद्ध काशीविश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत यात्रेचा समारोप केला.
माने यांनी नऊ दिवसांच्या ९९ किलोमीटरच्या पायी प्रवासातील अनुभव कथन केले. या पदयात्रेतून रत्नागिरीच्या नागरी सुविधांची नेमकी दुर्दशा पाहायला मिळाल्याचे सांगितले. शहरातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, क्रीडांगणे आणि उद्याने यांची झालेली दयनीय अवस्था त्यांनी ठळकपणे मांडली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

