हत्तीबाधितांना नेमकं हवंय काय?

हत्तीबाधितांना नेमकं हवंय काय?

Published on

हत्तीबाधितांना नेमकं हवंय काय?

गणेशप्रसाद गवस ः पकड मोहिमेच्या विरोधावरुन प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ ः तिलारी खोऱ्यात गेली अनेक वर्षे असणारा हत्ती प्रश्न थेट सावंतवाडी तालुक्यापर्यंत पोहचला. अलीकडे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी शासन अनुकूल असतानाचा याच भागातील स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. ‘आमचा हत्ती वनतारात नको, तिलारीतच राहू द्या’ अशी मागणी पुढे येत असताना शासनाला दोषीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मात्र, आता हत्ती पकड मोहीम हवी म्हणणारे गेले कुठे? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केला आहे.

ज्यांना तिलारीत हत्ती किंवा अन्य वन्यप्राणी हवेत असे वाटते ते प्राण्यांची योग्य निगा घेऊ शकतात कारण ते अभ्यासक आहेत. तिलारीत शासकीय जागेत प्रतिवनतारा प्रकल्प करण्यासाठी त्यांनी पुढे यावे शासन पूर्ण सहकार्य करेल. यासाठी मी स्थानिक आमदार तसेच वनमंत्री यांची भेट घेईन, जेणेकरून तिलारीत पर्यटन बहरेल, असेही श्री. गवस म्हणाले.
श्री. गवस पुढे म्हणाले, ‘तिलारी खोऱ्यात गेली अनेक वर्षे रानटी हत्ती उपद्रव प्रश्न आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी शासन, लोकप्रतिनिधी यांना टार्गेट करत अनेकवेळा आंदोलने छेडली. अलीकडेच एका हत्तीला पकडण्यासाठी सुतोवाच करण्यात आले तेव्हा तो हत्ती वनतारा येथे नेला जाईल तो तिलारीतच राहावा यावरून शासनावर स्थानिक पातळीवरून टीका सुरु झाली हा विरोधाभास का निर्माण केला जात आहे. जर तिलारीतील हत्ती किंवा अन्य प्राणी तिलारीत रहायला हवे तर केवळ वनतारावर टीका करून काही साध्य होणार नाही. प्रति वनतारा तिलारीत निर्माण होण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढे यायला हवे. शासन त्यांना सहकार्य करेल. पण, आता तिलारीतील शेतकऱ्यांनी एकतर पकड मोहीम किंवा जसे हत्ती आहेत तसेच राहू देत पैकी एकच भूमिका घेऊन पुढे यायला हवे. दुटप्पी भूमिकेने प्रश्न सुटणार नाही.’
-----------
‘हत्तीग्राम’साठी मते विचारात घ्या
यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींची स्टेटमेंट पाहिली असता हत्ती ग्राम तिलारीत व्हावे, असा आग्रह होता. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली म्हणून हत्ती पकड मोहीम राबविण्याचा विचार पुढे आला; अन्यथा हत्तीग्राम ही संकल्पना पुढे आली असती. त्यामुळे उठसुठ शासनावर टीका यापुढे सहन केली जाणार नाही. जे पर्यावरण प्रेमी आहेत, त्यांनी शेतकऱ्यांची मते विचारात घ्यावीत नाहक टीका टिप्पणी झाल्यास आम्हीही तसेच उत्तर देऊ, असेही श्री. गवस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com