फिरस्ती

Published on

फिरस्ती---------लोगो

समस्यांची पूर्ती व्हायला हवी...

नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सामान्य माणसाच्या समस्यांकडे सर्वच राजकीय पक्षांनी पाठ फिरवली आहे. शहरातील रस्त्यांची कामे आता सुरू आहेत; परंतु गेले दोन वर्षे रत्नागिरीतील खड्ड्यांनी अनेकांचा बळी घेतला. रत्नागिरीला अजून २४ तास पाणी देण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. नैसर्गिक उताराचा उपयोग करून धरणातून पाईपद्वारे पाणी आणून ते अखंडितपणे देण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ नाहीत. फिरत्या विक्रेत्यांमुळे संध्याकाळी रामआळीसारख्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, वाहनांची संख्या वाढतेय; पण पुरेसे पार्किंगझोनच नसल्यामुळे वाहनचालकांची कुचंबणा होते. अनेक ठिकाणचे रस्त्यावरचे दिवे नियमित पेटलेले दिसत नाहीत. सकाळी चालण्याच्या व्यायामासाठी सुरक्षित मैदान किंवा ट्रॅक अस्तित्वात नाही, अशा एक ना अनेक समस्या रत्नागिरी शहरात अनुभवायला मिळत आहेत. नव्याने येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून या समस्यांची पूर्ती व्हायला हवी, एवढी माफक अपेक्षा सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com