वेताळ प्रतिष्ठानतर्फे खुली निबंध स्पर्धा
वेताळ प्रतिष्ठानतर्फे खुली निबंध स्पर्धा
वेंगुर्ले ः वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळस यांच्यातर्फे सलग बाराव्या वर्षी ‘अश्वमेध’ महोत्सवांतर्गत खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे विषय समाजजीवनातील जबाबदारी, राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्यांचा विचार मांडणारे आहेत. ही स्पर्धा खुला गट आणि शालेय गट (दहावीपर्यंत) अशा दोन गटात होईल. खुल्या गटासाठी ‘राजकारणात मूल्यांची कमतरता: जबाबदार कोण?’, तर शालेय गटासाठी ‘मी मोठा झालो की देशासाठी काय करेन?’ हा विषय आहे. खुल्या गटासाठी अनुक्रमे ११००, ७७७, ५५५ आणि चषक व प्रमाणपत्र, शालेय गटासाठी ७७७, ५५५, ३३३ रुपये आणि चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके आहेत. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. खुला गटाकरिता किमान १००० शब्द, तर शालेय गटासाठी ५०० शब्द अशी शब्दमर्यादा आहे. पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि शालेय गटासाठी शाळेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस, द्वारा डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मु. पो. तुळस, खरीवाडी (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) या पत्त्यावर २५ डिसेंबरपर्यंत निबंध पाठवावेत, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

