महायुती सरकार पारदर्शकता व नैतिकतेत अपयशी
महायुती सरकारमध्ये पारदर्शकतेचा अभाव
जमीर माखजनकर यांचा आरोप ; नियोजनशून्य कारभार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः राज्यातील महायुती सरकारमध्ये पारदर्शकता, नैतिकता आणि इमानदारीचा पूर्ण अभाव आहे, असा आरोप रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव जमीर माखजनकर यांनी केला आहे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेपासून ते सार्वजनिक सेवांपर्यंत सर्व स्तरांवर गोंधळ, अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा त्यांनी आरोप केला.
माखजनकर म्हणाले, सरकार पारदर्शकतेचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात अनेक महत्त्वाचे निर्णय जनतेपासून लपवले जातात. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सरकारकडून लगेच क्लीनचिट दिली जाते. त्यामुळे जनतेत शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उर्दू व अल्पसंख्याक विभागातील स्थिती अत्यंत खराब आहे. आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता तीव्र असून परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. सरकारचा कारभार नियोजनशून्य असून वेळकाढूपणा आणि निष्क्रियतेमुळे जनतेची पिळवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार बोलतं एक आणि करत एक असल्याने जनतेचा विश्वास उरलेला नसल्याचे मत व्यक्त करत माखजनकर यांनी महायुती सरकारवर थेट प्रहार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

