रस्त्यासाठी निधी देताना कोकणाला स्वतंत्र निकष लावा
09491
राजापूर ः हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार नीलेश राणे.
रस्त्यासाठी निधी देताना
कोकणाला स्वतंत्र निकष लावा
नीलेश राणे; हिवाळी अधिवेशनात मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ : यंदा कोकणात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे रस्ते आणि महामार्गाची दुरवस्था झाली आहे. याकडे आमदार नीलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे. कोकणात पडणारा पाऊस लक्षात घेता मराठवाडा व विदर्भाचे निकष न लावता कोकणाला स्वतंत्र निकष लावावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनामध्ये आमदार नीलेश राणे यांनी औचित्याच्या मुद्यांद्वारे कोकणातील रस्त्यांसह महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले. या वेळी ते म्हणाले, ‘कोकणात यंदा सुमारे सहा महिने पाऊस पडला. तुम्ही विचार करा, त्या रस्त्यांची अवस्था काय झाली असेल? आम्ही ठेकेदारांना जेव्हा विचारतो, त्यांच्याकडे काहीच उत्तर नसते. आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो, त्यांच्याकडून उत्तर मिळत नाही. सहा महिने पाऊस पडल्यामुळे अधिकारी व ठेकेदार ढगांकडे बोट दाखवतात. कदाचित अजून पाऊस पडेल, या अपेक्षेवर ते लोक आहेत. मागची बिले काढली गेली नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातून नवीन ठेका घ्यावा की, न घ्यावा, असा अनेकांना प्रश्न आहे. सरकारने दुरूस्तीला पैसे दिले. पाऊस जास्त पडला. त्यामुळे दुरूस्तीचे पैसे येऊनसुद्धा रस्ते दुरूस्त झालेले नाहीत. महामार्गाचा पण तोच विषय आहे. एमडीआरचे रस्ते असे कधीच खराब झाले नाहीत. तेवढे या पावसाळ्यात खराब झाले. दरवर्षी आपल्याला जर रस्ते बनवावे लागले तर तो रस्ता टिकणार कसा? काही ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावे लागेल तर काही अधिकार्यांवर कारवाई करावी लागेल. नाहीतर, दरवर्षी तोच तोच रस्ता करावा लागेल. माझ्या मतदार संघात ४ हजार मिलिमीटर हा पाऊस पडतो. आम्ही तर रस्ते कसे टिकवायचे? मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इकडे येतात. मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहतूक तिथे होते, डंपर वाहतूक होते अशा परिस्थितीत जर आपण रस्त्याची क्वालिटी जर मेन्टेन केली नाही तर कसे होणार? जिथे पाऊस चार इंच पडत नाही त्या ठिकाणचे निकष कोकणच्या रस्त्यांना लावणार असू तर ते रस्ते टिकणार कसे? कोकणातील रस्ते सुस्थितीत करावेत. कोकणचे जे निकष आहेत ते बदलून टाकताना विदर्भाचे निकष कोकणाला लावू नये, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

