जिल्ह्यात आठ महिन्यात ८९ बालकांचा मृत्यू
जिल्ह्यात आठ महिन्यात ८९ बालमृत्यू
आरोग्य विभागासमोर आव्हान; मातामृत्यू आटोक्यात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यावधीचा खर्च, लसीकरण मोहीम आणि विशेष उपक्रम राबवूनही महाराष्ट्रात ४३ महिन्यात नवजात बालकांचे मृत्यू होत आहेत. १ ते ५ वर्षाच्या मुलांतील मृत्यूदरात १.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रत्नागिरीत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अल्प आहे. मात्र गेल्या आठ महिन्यात ० ते ५ वयोगटातील ८९ बालकं मृत पावली आहेत.
अकाल जन्म, कमी वजन, श्वसन समस्या, संसर्गजन्य रोग्, जन्मजात दोष किंवी विकृती, कुपोषण, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरची अपूरी काळजी ही कारणे बालमृत्यूला कारणीभूत आहेत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात ८९ बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधित जिल्हा रुग्णालयासह, अन्य शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालये यामध्ये ७ हजार ५०० प्रसूती झाल्या. आरोग्य विभागाकडून माता-मृत्यू, नवजात बालमृत्यू रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले आहेत. मातेला प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चात योग्य प्रकारची वैद्यकीय सेवा आणि सुविधा दिल्या जातात. त्यामुळे माता मृत्यू रोखण्यात या विभागाला यश आले आहे. आठ महिन्यात विविध कारणांनी दोन मातांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
अकाली बालमृत्यूची कारणे..
अकाली जन्मलेल्या बाळाला जगविणे अवघड असते. जन्मापासून असलेले शारीरिक दोष किंवा विकृती. अतिसार, मलेरिया आणि इतर संसर्ग. न्यूमोनिया आणि जन्मावेळी श्वास गुदमरणे अशा श्वसनाच्या समस्या. अपुऱ्या पोषणामुळे रोग प्रतिकार शक्ती कमी होणे अशा कारणे अकाल बालमृत्यूची आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

