पर्यटनावर आजपासून पथनाट्य
पर्यटनावर रत्नागिरीत पथनाट्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने सागरकिनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्य सादर होणार आहेत. रत्नागिरीतील सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण होणार असून, त्याची सुरुवात रेल्वेस्टेशन येथे झाली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यर्थ्यांनी पथनाट्यातून पर्यटन, पर्यावरणाची जाणीवजागृती केली.
येत्या १५ ते १८ जानेवारी या कालावधीत सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे. सागरी जैवविविधता, खाडी, कांदळवन संवर्धनासाठी व्याख्याने, संशोधन, अभ्याससहल, पथनाट्य माध्यमातून समुद्राबद्दल जनजागृती व सहभाग वाढवणे या हेतूने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. पथनाट्याच्या माध्यमातून मासेमारी, जबाबदार पर्यटन, सागरी जीवनसुरक्षा या विषयाचे प्रबोधन व जाणीवजागृती करण्यात येणार आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

