संशयितांना अटक करा;
अन्यथा ‘जन आक्रोश’

संशयितांना अटक करा; अन्यथा ‘जन आक्रोश’

Published on

12812


संशयितांना अटक करा;
अन्यथा ‘जनआक्रोश’

आंबेगावातील शेतकऱ्यांचा इशारा ः मारहाणप्रकरणी सावंतवाडी पोलिस निरीक्षकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः ‘आंबेगाव येथील शेतकरी जानू धोंडी फाले यांना झालेल्या मारहाणप्रकरणी संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन दिवसांत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक न झाल्यास तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ पोलिस ठाण्यावर काढू,’ असा इशारा आंबेगाव सरपंच शिवाजी परब यांच्यासह ग्रामस्थांनी दिला. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना तसे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, ‘​१९ डिसेंबरला शेतकरी जानू धोंडी फाले यांना काही जणांनी गंभीर मारहाण केली होती. यात त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, या संदर्भात पीडित शेतकऱ्याने त्याच दिवशी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांकडून संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे दोन दिवसांत संबंधितावर उचित गुन्हा दाखल न झाल्यास अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी एकत्र येऊन पोलिस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढतील.’ दरम्यान, यावेळी रुपेश जाधव, संदेश कारिवडेकर, राहुल राणे, अण्णा केळुस्कर, राजा बरागडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com