''टॉप २०'' ग्रामपंचायती निश्चित करा

''टॉप २०'' ग्रामपंचायती निश्चित करा

Published on

14455

‘टॉप २०’ ग्रामपंचायती निश्चित करा

एकनाथ डवरे ः समृद्ध अभियानासाठी स्वयं मूल्यांकन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस ता, ३० ः स्वयंमूल्यांकन केलेल्या तालुक्यातील ‘टॉप २०’ ग्रामपंचायती तत्काळ निश्चित करा. या ग्रामपंचायतींना जिल्हास्तर आणि तालुकास्तर समितीने भेटी द्याव्यात. नावीन्यपूर्ण उपक्रमाचे व्हिडिओ, फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल करा, असे आदेश मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले.
महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबरला सुरू केलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उद्या (ता. ३१) संपणार आहे. या अभियान कालावधीची मुदत वाढण्याची शक्यता आहे. अभियानाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या ग्रामविकासाचे प्रधान सचिव एकनाथ डवरे यांनी सोमवारी (ता. २९) व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
श्री. डवरे म्हणाले, ‘पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर तयार केलेल्या वॉर रूमने नियमित सजग राहून तालुक्यात सुरू असलेल्या अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींनी केलेल्या विशेष व नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माहितीसह व्हिडिओ, छायाचित्रे संकेतस्थळ, सोशल मीडियावर व्हायरल करावी. गुगल फॉर्मही भरून घ्यावेत. आपापल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी केलेल्या उपक्रमाचे सातत्याने निरीक्षण करावे. अभियानाबाबत नियमित माहिती अपडेट करावी. स्वयं मूल्यांकन पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत यांच्यातील टॉपर २० ग्रामपंचायतींची निवड करावी. तेथे तालुका आणि जिल्हा समितीने गावभेटी देण्याचे नियोजन करावे. तालुका आणि जिल्हा समितीने आठवड्यातून किमान पाच ग्रामपंचायतींना भेटी द्याव्यात.’
.....................
सेलिब्रिटी देणार गावनिहाय भेटी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत चांगले काम केलेल्या गावांना सेलिब्रिटी भेट देणार आहेत. तसे नियोजन राज्य स्तरावरून करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पाच गावांना ही सेलिब्रिटी भेट देणार आहेत. गावांची नावे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर निश्चित करणार आहेत.
......................
१४८ ग्रामपंचायतींचे स्वतःचे संकेतस्थळ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचे संकेतस्थळ तयार करावे, असे निकषात नमूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४३३ पैकी १४८ ग्रामपंचायतींनी स्वतःचे संकेतस्थळ तयार केले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत, गावाची आणि अभियान अंतर्गत केलेल्या कामांची माहिती भरली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी दिली. प्रत्येक तालुक्यात ‘टॉप २०’ गावांची निवड केली आहे. या गावांची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल फुंड यांच्या संनियंत्रणाखाली समिती गठित केली आहे. त्यात आठ विभागांच्या खातेप्रमुखांचा समावेश आहे. ही जिल्हास्तर समिती तसेच गटविकास अधिकाऱ्यांची समिती गावांना भेटी देऊन परीक्षण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com