जबाबदार पर्यटनाचा पथनाट्यातून संदेश
सागर महोत्सवानिमित्त पथनाट्य
रत्नागिरी, ता. १२ : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त जबाबदार पर्यटनविषयक पथनाट्य मारुती मंदिर येथे सादर करण्यात आले. स्वच्छ सागरकिनारे, नैसर्गिक वातावरणाची सुरक्षा, प्लास्टिकमुक्त पर्यटनस्थळे या विषयीचा संदेश या पथनाट्यातून दिला गेला.
येत्या १५ ते १८ जानेवारी या कालावधीत सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे. सागरी जैवविविधता, खाडी, कांदळवन संवर्धन यासाठी व्याख्याने, संशोधन, अभ्याससहल, पथनाट्य माध्यमातून समुद्राबद्दल जनजागृती व सहभाग वाढवणे या हेतूने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. आदिती कुळये, रिया कुळये, पूर्वा चव्हाण, सार्थक सावंतदेसाई, साहिल शिंदे, आर्यन जमादार, अवधूत रेवाळे, दिव्या कीर, श्रेयस रसाळ, ऋषिकेश वाडेकर, पल्लवी निंबरे, प्रा. हरेश केळकर या पथनाट्यात सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

