कणकवली : अक्षर मित्र पुरस्कार
kan142.jpg
17786
अजय कांडर
साहित्य चळवळ योगदानासाठी
कांडर यांना अक्षरमित्र पुरस्कार
एक फेब्रुवारी रोजी लांजा रिंगणे येथे पुरस्काराचे वितरण
कणकवली, ता. १४ : येथील कवी अजय कांडर यांना राजापूर लांजा नागरिक संघ, मुंबई यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘अक्षरमित्र पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. लांजा–रिंगणे येथे होणाऱ्या अकराव्या ग्रामीण साहित्य संमेलनात १ फेब्रुवारी रोजी कवी कांडर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुभाष लाड आणि सरचिटणीस प्रमोद पवार यांनी दिली.
राजापूर लांजा नागरिक संघ, मुंबई यांच्यावतीने गेली काही वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. याच परंपरेनुसार यावर्षी साहित्य चळवळीत दिलेल्या भरीव योगदानासाठी कवी अजय कांडर यांची ‘अक्षरमित्र पुरस्कार’साठी निवड केली आहे.
कवी अजय कांडर हे कोकणातील एक जबाबदार साहित्य-सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेली ३५ वर्षे त्यांनी तळकोकणात सातत्याने आणि गांभीर्याने साहित्य चळवळ जोपासली आहे. साहित्य लेखन व वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न सुरू ठेवले आहेत. श्री. कांडर यांनी आवानओल प्रतिष्ठान, कणकवली, समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि संस्कृती प्रतिष्ठान, इचलकरंजी या साहित्य संस्थांची त्यांनी स्थापना केली असून, या संस्थांच्या माध्यमातून कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागांत अनेक दर्जेदार साहित्यिक उपक्रम राबविले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

