-राजापुरात अवघे तीनच अर्ज दाखल

-राजापुरात अवघे तीनच अर्ज दाखल

Published on

राजापुरात अवघे तीनच अर्ज दाखल
आज शेवटचा दिवस ; १८ जागांसाठी निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अवघा एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना तालुक्यामध्ये केवळ तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पेंडखळे आणि कातळी अशा पंचायत समिती गणातून हे उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून मनसेचे माजी तालुकाध्यक्ष सुनील जठार यांनी दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेसाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे बारा गण असे मिळून अठरा जागांसाठी होत असलेल्या लढतीसाठी बुधवारी (ता. २१) शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला इच्छुकांची झुंबड उडणार आहे. या निवडणुकीसाठी आज एकाच दिवशी तब्बल ३५ उमेदवारी अर्ज वितरित झाले असून, आजपर्यंत तब्बल १४५ उमेदवारी अर्ज वितरित झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला एक दिवस शिल्लक असताना आज पंचायत समितीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com