राजकीय दहशत पुन्हा मोडीत काढणार

राजकीय दहशत पुन्हा मोडीत काढणार

कणकवली - बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ करून माजी खासदार नीलेश राणे यांनी संस्कृती दाखवून दिली आहे. त्यांची ही राजकीय दहशतीची प्रवृत्ती लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा मोडीत काढेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी येथे दिला.

येथील विजय भवनमध्ये आमदार नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘राणेंनी निष्ठावंत शिवसैनिकांची मुळीच काळजी करू नये. ते सदैव शिवसेनेसोबत आहेत. खरी काळजी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी करावी. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यांचे काय होईल, याची चिंता त्यांना सतावते आहे.

बंदोबस्तावरील पोलिसांनाच शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा प्रकार योग्य नाही. सत्ता, संपत्ती आणि दहशतीचा वापर करून सिंधुदुर्गात सत्ता मिळविली होती; पण मागच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा गेली साडेचार वर्षे शांत होता; मात्र विरोधात पुन्हा मतदारसंघात अशांतता निर्माण करू पाहत आहेत; पण या लोकसभा निवडणुकीतही रत्नागिरी-सिंधुदुर्गची जनता निश्‍चितपणे चोख उत्तर देईल.’

नंतरच इतरांना उपदेश करा 
निवडणूक प्रचारादरम्यान राणेंकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांचे शिक्षण, इंग्रजी भाषेबद्दलचे ज्ञान याबाबत अपप्रचार केला जातोय; पण आपण काय करतोय याचा विचार त्यांनी आधी करावा आणि नंतरच इतरांना उपदेश करावा, असा टोलाही श्री. नाईक यांनी हाणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com