IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयात शरद पवार नंतर PM मोदीही सामील केले अभिनंदन

टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून लोक जल्लोष करत आहेत. विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. शरद पवार यांनी आनंदाने उड्या मारत जल्लोष साजरा केला.
 asia cup 2022 ind vs pak pm narendra modi sharad pawar
asia cup 2022 ind vs pak pm narendra modi sharad pawar sakal

IND vs PAK Asia Cup : भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आशिया चषक 2022 च्या गट सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला 148 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी दोन चेंडू बाकी असताना पूर्ण केले. हार्दिक पांड्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने तीन विकेट घेण्याव्यतिरिक्त बॅटने 33 धावांचे योगदान दिले.

टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून लोक जल्लोष करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले.

 asia cup 2022 ind vs pak pm narendra modi sharad pawar
Sharad Pawar : पाकिस्तानच्या पराभवानंतर शरद पवारांचा जल्लोष, Video होतोय व्हायरल

भारतीय संघाच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. शरद पवार यांनी आनंदाने उड्या मारत जल्लोष साजरा केला. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शरद पवार विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 asia cup 2022 ind vs pak pm narendra modi sharad pawar
Video | Jay Shah : बीसीसीआय अध्यक्ष जय शहांनी तिरंगा हातात घेण्यास दिला नकार

आशिया चषक 2022 च्या सामन्यात टीम इंडियाने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. संघाने उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला. विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन.

अमित शाह यांनी लिहिले, आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाची शानदार सुरुवात. हा अतिशय रोमांचक सामना होता. या शानदार विजयाबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन. असच चालू राहू दे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. हार्दिकने षटकार मारून सामना संपवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com