नवी दिल्ली : पाकमधील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या लढती इतर देशात खेळणार असल्याचे भारताने जाहीर केल्यानंतर पाककडून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील विश्वकरंडक स्पर्धेतील पाकच्या लढती बांगलादेशमध्ये खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानच्या लढती इतर देशात खेळणे शक्य आहे, असे विधान आयसीसीचे क्रिकेट व्यवस्थापक वसिम खान यांनी केले आहे. पाकमधील आशिया करंडक स्पर्धेबाबत भारताच्या भूमिकेला त्याचप्रमाणे उत्तर दिले जाऊ शकते असेही ते म्हणाले.
विश्वकरंडक स्पर्धा ही आयसीसीची स्पर्धा असून तिची घोषणा आयसीसीकडून जाहीर करण्यात येत असते आणि यंदाच्या एकदिवसीय स्पर्धेचे भारतच यजमान आहे. पाकने कितीही म्हटले तरी ते इतर देशात त्यांचे सामने खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.
...तर आशिया कप इतर देशात?
पाकमध्ये नियोजित असलेली आशिया करंडक स्पर्धा आता पूर्णपणे दुसऱ्या देशात खेळवली जाऊ शकते, अशी धमकी अप्रत्यक्षपणे बीसीसीआयकडून देण्यात आल्याचे समजते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.