Ranji Trophy : दोन दिवसांतच मुंबईचा विजय ; शार्दुलच्या सामन्यात १० विकेट

बाद फेरीतील प्रवेश अगोदरच निश्चित झालेल्या मुंबईने रणजी करंडक साखळी स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात आसामचा एक डाव आणि ८० धावांनी धुव्वा उडवला.
Ranji Trophy
Ranji Trophy sakal

मुंबई : बाद फेरीतील प्रवेश अगोदरच निश्चित झालेल्या मुंबईने रणजी करंडक साखळी स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात आसामचा एक डाव आणि ८० धावांनी धुव्वा उडवला. दुसरा दिवस पूर्ण व्हायच्या आतच मुंबईने हा विजय साकारला.

यंदाच्या रणजी स्पर्धेतील साखळीमध्ये मुंबईने सातपैकी पाच सामन्यांत निर्णयक विजय मिळवले. त्यामुळे मुंबईने सर्वाधिक ३७ गुणांची कमाई केली, पण अगोदरच त्यांनी उपांत्यपूर्व फेरी निश्चित केली होती.

Ranji Trophy
Badminton Asia Team : भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम फेरीत ; त्रिसा-गायत्री गोपीचंद आणि अनमोल यांचे सनसनाटी विजय

भारतीय संघातून दूर करण्यात आलेला शार्दुल ठाकूर मुंबईच्या या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या डावात ६ आणि आज दुसऱ्या डावात ४ अशा त्याने १० विकेट मिळवल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com