Ranji Trophy : रणजी सामन्यादरम्यान मोठा ड्रामा, आउट दिल्यानंतरही कर्णधार रहाणे पुन्हा आला फलंदाजीला

Ranji Trophy Ajinkya Rahane : देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीत चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.
Ajinkya Rahane news in marathi
Ajinkya Rahane news in marathi sakal

Ranji Trophy Ajinkya Rahane : देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीत चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आसामचे फलंदाज पहिल्या डावात फ्लॉप ठरले आणि संपूर्ण संघ 84 धावांत आटोपला. यानंतर मुंबईचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मैदानावर वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला.

Ajinkya Rahane news in marathi
Ind vs Eng : 11 आणि 10 खेळाडूसोबत खेळणार टीम इंडिया; कर्णधार रोहितीची 'ती' चुक आली अंगलट, जाणून घ्या ICC चा नियम

झालं असं की, आसामविरुद्ध मुंबई संघ चार गडी गमावून 102 धावा करून खेळत होता. आणि संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची वैयक्तिक 18 धावांवर खेळत होता. यानंतर त्याने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने खेळून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवम दुबेने पळण्यास नकार दिला. रहाणे खूप पुढे आला होता आणि आसामचा कर्णधार दानिश दासने चेंडू उचलून यष्टिरक्षकाकडे फेकला, पण तो क्रीझवर परतण्याचा प्रयत्न करत असलेल्या रहाणेला लागला.

Ajinkya Rahane news in marathi
Ind vs Eng : चालू सामन्यात टीम इंडियाला धक्का! R Ashwin तिसऱ्या कसोटीतून बाहेर, BCCIने सांगितले कारण

यानंतर आसामच्या सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊटचे आवाहन केले आणि मैदानी पंचांनीही हे आवाहन मान्य केले. या निर्णयानंतर लगेचच पंचांनी चहाचा ब्रेकही जाहीर केला. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊट देण्यात आले. मात्र काही वेळाने आसाम संघाने अपील मागे घेतले आणि रहाणे पुन्हा फलंदाजीला आला.

Ajinkya Rahane news in marathi
Asia Team Championships : महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला

नियमांनुसार, पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी बाद करण्याचे अपील मागे घ्यावे लागते आणि जेव्हा अंपायर तो स्वीकारतो तेव्हाच फलंदाज फलंदाजीला परत येऊ शकतो. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला आणि दरम्यान आसाम संघाने आपला निर्णय बदलला.

मात्र रहाणेला याचा फायदा घेता आला नाही आणि तो केवळ 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रहाणेचा आतापर्यंतचा रणजी हंगाम खराब राहिला असून त्याने आठ डावांत 16.00 च्या सरासरीने केवळ 112 धावा केल्या आहेत. मुंबई संघाने आतापर्यंत 6 गडी गमावून 217 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com