
मुंबई : आशियाई क्रिकेट करंडकाची (टी-२० प्रकार) रंगत ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात भारतीय संघाची वरिष्ठ निवड समिती टीम इंडियाची निवड करणार आहे, मात्र निवड समिती सदस्यांसमोर भारतीय संघ निवडीचा मोठा पेचप्रसंग असणार आहे. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर हे खेळाडू आता उपलब्ध असल्यामुळे अंतिम संघात कोणाला संधी देण्यात येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे.