'रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची गरजच काय होती? त्यापेक्षा शुभमन गिलला हटवा'; BCCI ला मिळालाय सल्ला...

Why Rohit Sharma was removed as ODI captain? भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदावरून पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे. वन डे संघाच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवण्याच्या BCCI च्या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे.
Manoj Tiwary statement on Rohit Sharma captaincy

Manoj Tiwary statement on Rohit Sharma captaincy

esakal

Updated on

BCCI decision on Shubman Gill captaincy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रोहित शर्माच्या जागी वन डे संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल याची निवड केली. बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक मतमतांतर आजही आहेत. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात आले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत बोर्डाला ४० वर्षीय रोहित कर्णधार नकोय. हा निर्णय अनेकांना पटला, परंतु अजूनही तो पचवणे काहींना जड जातंय. वय हा फॅक्टर असला तरी रोहित चांगला खेळतोय, असे त्यांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com