
भारत आणि इंग्लंड यांच्यातीत बहुप्रतीक्षित पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेस २० तारखेपासून सुरुवात होत आहे. यातील पहिलाच सामना लीड्स येथे होणार आहे, तर मॅचेस्टर येथे मालिकेतील चौथा सामना नियोजित आहे. हे दोन्ही सामने जिंकणे भारतासाठी महत्त्वाचे आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन म्हणतो.
लीड्स आणि मँचेस्टर येथील सामने जिंकले तर भारताला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याची अधिक संधी आहे, असे मत हेडनने व्यक्त केले. तर संजय मांजरेकर आणि दीप दासगुप्ता यांनी इंग्लंडला झुकते माप दिले आहे.